महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने महिलांचा सन्मान
पारोळा (प्रतिनिधी ) – स्त्री ही कुटुंबात असेल किंवा नोकरीत मात्र ती आपले संस्काराचे जतन नेहमी करीत असते. त्यामुळेच आपली संस्कृती ही अनादी काळापासून आजपर्यंत स्त्री महत्वानेच जतन आहे. असे प्रतिपादन काँग्रेस व्ही. जे. एन. टी. सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष जाधव यांनी काँग्रेस पक्षामार्फत स्त्री शक्तीचा सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ पटोले,पल्लवीताई रेणके यांच्या मार्गदर्शनानुसार विमुक्त जाती भटक्या जमाती विभाग जळगांव तर्फे महिलांचे शैक्षणिक योगदान व बचतगटामार्फत महिलांना स्वयंरोजगासाठी मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी महाराष्ट्र काँग्रेस व्ही. जे. एन. टी.सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. सुभाष जाधव यांनी महिलांना भेट वस्तू, विध्यार्थिनींना शैक्षणिक साहीत्य देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाला पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.